History of India In Marathi – सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक
History of India In Marathi – सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
स्मृतीदिन – २९ सप्टेंबर १६८९
24/9/2021
हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकवि साव्या शतकापर्यंत देव,देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी
एकनिष्ठ राहिलेलं एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या
शतकात हे महाडला आले महाड वरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले .त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशहाच्या लुटालूटीत मरण पावले .
त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती .नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णा जींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली.
कान्होजी १६५० ला युद्धात मरण पावले . त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराजांचे बरोबर कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक
यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते .जी मोहिम छत्रपती देतील ती मोहीम यशस्वी करूनच
हरजीराजे येत होते.छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजीराजांना” राजेशाही “
हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याच्या महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे अशा कर्तबगार राजेमहाडिक
घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. ( History of India In Marathi )
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंजावाती आक्रमणापासून वाचवला.
त्यांनी त्यावेळी जिंजी व वेल्लोर,मद्रास ,म्हैसूर ,अर्काट, बंगळूर आधी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तामिळनाडू हरजीराजे ने जिंजीच्या आधिपत्याखाली आणले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९ मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच काही काळ राज्यकारभार केला.
छ. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले.
Also Read : https://www.postboxindia.com/sharad-pawar-news-sharad-pawar-news/
1 Comment