Impact of British rule in India – ब्रिटिश सत्तेच्या छाताडावरची ऐतिहासिक उडी
Impact of British rule in India – आज 24 जुलै 2020. 77 वा स्मरणदिवस.
22/7/2021
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक उड्या नोंदवल्या असतीलही, पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील
जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती.
सांगलीचा जेल फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्यसैनिकांनी उड्या घेतल्या, त्या त्यांच्या शौर्याला सलाम.
१९४२ चं वर्ष म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातलं धगधगणारं वर्ष. महात्मा गांधीजींनी ( Impact of British rule in India ) ब्रिटिश सत्तेला चले जाव चा इशारा दिला
आणि सारा देश रस्त्यावर उतरला. सांगली म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हाही या लढ्यात धगधगत होताच. अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होते
आणि बिनीचे साथीदार तुरुंगात होते. १९४२ च्या चळवळीत क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल वसंतदादा पाटिल, हिंदूराव पाटील , गणपतराव कोळी,
जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेव बुटाले, वसंत सावंत, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, विट्ठल शिंदे, जयराम बेलवलकर,
दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबूराव पचोरे यांना कैद करुन ब्रिटिशांनी सांगलीच्या जेलमध्ये डांबले होते.
पण तुरुंगाला घाबरतील ते लढवय्ये कसले? त्यांनी तुरुंगात बसूनच तुरुंग फोडायचा जबरदस्त प्लॅन तयार केला. नुसता तयार केला नाही
तर तो फोडलाही. स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात दादा होते. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी,
पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते. तेव्हा सांगली जिल्हा झाला नव्हता. दादांना पकडायला बक्षीस होते.
दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड-या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला.
दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले.