Freedom Fighter of india थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवले येथे झाला.पांडुरंग टोपे यांच्या आठ पुत्रापैकी तात्या हे दुसरे अपत्य. दुसर्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सेवक त्रिंबकजी डेंगळे यांच्या ओळखीने पांडुरंगराव बाजीरावांच्या पदरी आले.
भारतभर चाललेल्या इंग्रजांच्या दडपशाहीमुळे १८५७अठ मध्ये हिंदी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा चालू केला.४ जून रोजी कानपूरच्या शिपायांचा प्रमुख Freedom Fighter of india टीकासिंग, तात्या टोपे व नानासाहेब यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याची सुरुवात केली.
तिथल्या इंग्रजांचा दोन आठवड्याच्याा लढाईत पराभव करून खजिना व शस्त्रागार ताब्यात घेऊन नानासाहेबांनी स्वातंत्र घोषित करून बिठूरला आले. तात्या टोपे कानपूरलाच थांबले. कानपूर पडल्याचे कळताच हॅवलाॅक व नील हे इंग्रज अधिकारी मोठे सैन्य घेऊन कानपूर वर चालून आले.
या सैन्यापुढे टिकाव न लागल्याने Freedom Fighter of india तात्या टोपे उरलेले सैन्य घेऊन ग्वाल्हेरला गेले. नानासाहेब बिठूरहून निघून लखनौकडे गेले. इंग्रज सैन्याने बिठूर काबीज करून मुख्य सैन्य लखनौकडे रवाना करताच तात्या टोपे यांनी पुन्हा हल्ला करून कानपुर काबीज केले. पण अल्पावधीतच इंग्रजांनी कानपुर वर चाल करताच तात्यांनी कानपूर सोडले. ह्यावेळी खजिना व शस्त्रे तात्यांनी आपल्या सैन्याबरोबर नेली. यांच्या साह्याने तात्यांना काल्पी काबीज करून सात हजारांची फौज उभी केली.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून Freedom Fighter of india नानासाहेबांनी तात्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.
१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती.
कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाचा अभाव पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण Freedom Fighter of india तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.
Freedom Fighter of india नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास , गाॅल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत शत्रूवर जरब बसवत होता. वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा प्रयत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता.
तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी Freedom Fighter of india तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.
Also Visit : https://www.postboxlive.com