Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

savitribai phule biography – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

1 Mins read

savitribai phule biography – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

 

 

savitribai phule biography – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

 

१० मार्च सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन एकोणिसाव्या शतकात अंधश्रध्देने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणार्या

सावित्रीबाई समाजाच्या वाटेवरील अपमानाचे काटे दूर करीत न डगमगता न थकता अखेरपर्यंत लढत राहिल्या.

त्या सावित्रीबाईना समस्त स्रियांच्यावतीने कोटी कोटी प्रणाम

तुझ्या महतीची काय गाऊ मी गाथा ”
तुझ्याशिवाय आमची अधुरी ही कथा ”
समाजासाठी ना करी पर्वा जीवाची क्षणी ”
निर्भय धाडसी अशी तुच एक हिरकणी ”
चुला – मुला पलीकडे घालून दिली शिक्षणाची मैत्री”
समस्त स्त्री जन्म रूणी तुझा अशी तुच सावित्री”
तुझ्या प्रत्येक रूपाला माझा सलाम घ्यावा ”
समस्त स्त्रीवर्गाला आशिर्वाद तू द्यावा”
प्रणाम माझे कोटी कोटी तुला आता”

ज्योतिबा फुले स्वत: एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या.लग्नानंतर ज्योतीबांनी

त्यांना लिहायला,वाचायला शिकवले.नंतर याच सावित्रीबाईंनी दलित समाजातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिल्या शिक्षक म्हणून गौरव प्राप्त केला. त्यावेळी मुलींची

अवस्था अत्यंत दयनीय होती आणि त्यांना वाचन-लेखन करण्यासही परवानगी नव्हती.ही पद्धत मोडण्यासाठी ज्योतिबा आणि ( savitribai phule biography )

सावित्रीबाई यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी शाळा स्थापन केली. भारतात मुलींसाठी सुरु होणारी ही पहिली महिला शाळा होती.

स्वत: सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी या शाळेत जात असत. पण हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला.

त्यांनी केवळ लोकांकडून होणार अपमान सहन केले नाही तर लोकांनी फेकलेल्या दगडांचा फटका ही सहन करावा लागला. सावित्रीबाई शाळेत जात असताना धर्माचे

कंत्राटदार आणि स्त्री शिक्षणाचे विरोधी, कचरा, गाळ आणि शेणच नव्हे तर मानवी मलदेखील त्यांच्यावर टाकत असत.यामुळे सावित्रीबाईचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे,

म्हणून त्या आणखी एक साडी आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्यावर ती बदलत असे. इतके असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण,

सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थान यांचे कार्य चालूच ठेवले.

विधवा पुनर्विवाहासाठी संघर्ष :

महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि १८५४ मध्ये विधवांसाठी आश्रम बांधले. स्त्री-बालहत्या रोखण्यासाठी

त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला. आज देशात स्त्री भ्रूणहत्येचा वाढता कल पाहता त्या काळात स्त्री-बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि

ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते, हे समजून येते.
विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सती प्रथा रोखण्यासाठी,पुनर्विवाह साठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले

यांनी पतीसमवेत काशिबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी

घेतली आणि वेळेवर तिची प्रसुती केली. नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले जो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला.

सावित्रीबाई फुले ( savitribai phule biography ) यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी पुण्यातच १८ महिला शाळा उघडल्या.१८५४ वर्षी ज्योतिबा

आणि सावित्रीबाई फुले यांनी अनाथआश्रम उघडले, एका व्यक्तीद्वारे भारतात सुरु होणारे हे पहिले अनाथआश्रम होते. यासह, अवांछित गर्भधारणेमुळे होणारे बालहत्या

रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही उभारले.

त्यांच्या समाजोत्थान कार्यात काम करीत ज्योतिबा यांनी आपल्या अनुयायांसह २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. ज्योतिबा हे स्वतः

अध्यक्ष होते आणि सावित्रीबाई फुले महिला विभागाच्या प्रमुख होत्या. या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शूद्र आणि अत्यंत शूद्रांना उच्च जातीच्या शोषणापासून मुक्त करणे.

ज्योतीबांच्या कार्यात सावित्रीबाईंनीही मोलाचे योगदान दिले. ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर निम्न जाती, महिला आणि दलित यांच्या उद्धारासाठी काम केले. या कामात

त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान अनन्य आहे. अगदी कधीकधी स्वत: ज्योतीबा फुले स्वतः पत्नी सावित्रीबाई फुले यांचे मार्गदर्शन घेत असत.

२८नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर, त्यांच्या अनुयायांसह सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची

अपूर्ण कामे पूर्ण करुन सत्य शोधक समाज दूरदूरपर्यंत पसरविला.१८९७ मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली . प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना

सावित्रीबाई फुले स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यावेळी ही सर्व कामे करणे इतके सोपे नव्हते जितके ते आज वाटते. समाजातील अनेक अडचणी व तीव्र विरोध असूनही, महिलांचे जीवनमान आणि शिक्षण

सुधारण्यासाठी व रूढीवादी प्रथा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देश नेहमी सावित्रीबाई फुले यांचे ऋणी आहे.

सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!