Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

highest sports award in india – राजीवजी गांधी

1 Mins read

highest sports award in India – राजीवजी गांधी

 

highest sports award in India – स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

 

 

राजीव – ” तो पुन्हा कधीच परतला नाही, तो गेला तो कायमचाच !”

 

” 20 मे 1991 रोजी राजीव आणि मी सकाळी ७.३० वाजता मतदानाला गेलो. तापमान त्यावेळी सुसह्य होते. राजीवने पांढरा कुर्ता पायजमा

घातला होता आणि त्याच्या खांद्यावर तिरंगी उपरणे होते! मतदान करून परत आल्यावर राजीवने मला घरी सोडले आणि तो लगेच निघून गेला

कारण त्यास पुढच्या दौ-यावर जायचे होते. सायंकाळी परत दिल्लीत येवून तो ओरिसा आणि दक्षिण भारताच्या दौ-यावर जाणार होता कारण दोन दिवसांनी तिथे मतदान होते.

परंतु अचानक पणे राजीव पुन्हा घरी आला आणि आम्ही सर्वच जन अाश्चर्यचकित झालो. तो थोड्यावेळासाठीच का असेना पण त्याच्या

येण्याने मी आणि प्रियांका खूप आनंदी झालो. त्याने अांघोळ केली आणि राहुलला फोन केला. राहुल त्यावेळी अमेरिकेत शिकत होता, त्याच्याशी फोनवर बोलताना म्हणाला “

I am calling to wish you luck in your exam ,Rahul ! and tell you how happy I am that you will be in home soon,

Its going to be great summer, I love you Bye bye”

 

मग राजीवने प्रियांकाला जवळ घेवून , तिचा एक गोड पापा घेतला. त्याला पुन्हा जायचे होते, पण आनंदाची बाब अशी की त्याच्या

निवडणुकीच्या दौ-र्यातील हा शेवटचा दौरा होता.

“तू थांबू शकणार नाहीस काय आणि या दौऱ्या मुळे निवडणुकीचे परिणाम बदलतील थोडेच!” मी राजीवला म्हणाले

तो माझा हात हातात घेत हसत हसत म्हणाला “ मला माहित आहे ,परंतु सर्व कांही पूर्वीच नियोजन झालेले आहे, असे काय करतेस अगदी

शेवटचा प्रयत्न देखील आपल्याला ( highest sports award in india ) अधिक यश घेऊन येईल बघ, आणि केवळ दोन दिवसांचा प्रश्न आहे

आपण पुन्हा एकत्रितच असणार आहोत”

त्याने हसत हसत गुड बाय म्हटले आणि माझा निरोप घेतला. पडद्याच्या फटीतून तो दिसेनासा होईपर्यंत मी त्याच्या कडे पाहत उभी होते.

परंतु तो कधीच परतला नाही, तो गेला कायमचाच”

सोनिया गांधी
‘ राजीव ‘
साऊथ एशिया बुक्स
, नवी दिल्ली
पान क्रमांक १४ आणि १५

खरेतर राजीव गांधी यांना राजकारणात रस नव्हता आणि एअरलायन पायलट म्हणून ते काम करत होते.१९८० मध्ये विमान अपघातात त्यांचे छोटे

भाऊ संजय गांधी यांच्या अकाली निधनानंतर राजीव गांधी यांनी १९८१ मध्ये आई इंदिराजींच्या समर्थनासाठी राजकारणात प्रवेश केला.नंतर त्यांनी

अमेठी येथून लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार झाले. आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते पंतप्रधान बनले. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये

सर्वाधिक बहुमताने ते पंतप्रधान बनले.

राजीव गांधी हे भारतातील माहिती क्रांतीचे जनक ( highest sports award in india ) मानले जातात. देशातील संगणकीकरण आणि दूरसंचार

 

क्रांतीचे श्रेय त्याना जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांना ३३% आरक्षण देण्याचे काम राजीवजीनी केले. राजीव गांधी यांनी मतदाराचे

वय २१ वर्षांनी कमी करून १८ वर्षांपर्यंतच्या तरुणांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळवून दिला.

राजीव गांधी यांचा असा विश्वास होता की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय उद्योग वाढू शकत नाहीत. संगणक क्रांती भारतात आणण्याचे

श्रेय राजीव गांधींचे आहे. त्यांनी संगणक भारताच्या घरा घरात नेण्याचे काम केले नाही तर भारतात माहिती तंत्रज्ञानाला पुढे नेण्यात महत्वाची

भूमिका बजावली. त्या काळात संगणक घरात आणणे इतके सोपे नव्हते. त्यावेळी संगणक महागडे होते, म्हणून सरकारने संगणकास त्याच्या

नियंत्रणावरून काढून टाकले आणि मदरबोर्ड आणि प्रोसेसर असलेले पूर्णपणे एकत्रित संगणक आयात करणे सुरू केले. सर्वसामान्यांना

संगणकात प्रवेश करणे सुलभ व्हावे यासाठी त्यांनी संगणक उपकरणांवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला.

 

पंचायती राज व्यवस्थेचा पाया घालण्याचे श्रेयही राजीव गांधी त्यांच्याकडे जाते. वास्तविक, राजीव गांधी यांचा असा विश्वास होता की जोपर्यंत

पंचायती राज व्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत लोकशाही खालच्या पातळीवर पोहोचू शकत नाही. आपल्या कार्यकाळात त्यांनी पंचायती राज

व्यवस्थेचा संपूर्ण प्रस्ताव तयार केला.राजीवजींच्या हत्येच्या एका वर्षानंतर घटनात्मक दुरुस्तीतून पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हा

राजीव गांधींच्या विचारसरणीची जाणीव झाली. राजीव गांधी सरकारने तयार केलेल्या ६४ व्या घटनात्मक दुरुस्ती विधेयकाच्या आधारे नरसिंहराव

सरकारने ७३ व्या घटनात्मक दुरुस्ती विधेयक मंजूर केले.२४ एप्रिल १९९३ पासून देशभरात पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात आली. या व्यवस्थेचा हेतू होता सत्तेचे विकेंद्रीकरण.

ग्रामीण व शहरी भागातील नवोदय विद्यालयाचा पायाही राजीव गांधींनी ( highest sports award in india ) घातला होता. जवाहर नवोदय विद्यालयाचा

पाया त्यांच्या कार्यकाळातच लागला होता. या निवासी शाळा आहेत. यशस्वी गुणवंत मुलांना या शाळांमध्ये प्रवेश मिळतो. मुले सहावी ते बारावीपर्यंत

विनामूल्य शिक्षण घेतात आणि वसतिगृहांमध्ये राहतात.

 

राजीव गांधी हे देशातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय नेते होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक प्रतीक्षा करत असत राजीव गांधी हे देशातील

सर्वात तरुण पंतप्रधान होते .पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी असे अनेक निर्णय घेतले ,ज्याच्या देशाच्या विकासावर खुप चांगला परिणाम झाला.

अशा या थोर लोकप्रिय पंतप्रधानांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

error: Content is protected !!