capital city of maharashtra – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र
capital city of maharashtra – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र – सुनील तांबे
मुंबईत ब्रिटिशांनी किल्ला बांधला होता. किल्ल्याभोवती खंदकही होता.
सत्ता स्थिरावल्यावर किल्ला पाडून टाकण्यात आला, खंदक बुजवण्यात आला.
किल्ल्याला अनेक दरवाजे होते. अपोलो गेट, बझार गेट, चर्चगेट.
जिथे चर्चगेट होतं त्याच जागेवर फ्लोरा फाऊंटन आहे. फ्लोरा ही फुलांची रोमन देवता. मुंबईसह संयुक्त
महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन झालं. मोरारजी देसाई राज्याचे गृहमंत्री होते. आंदोलकांवर गोळीबार
करण्याचा आदेश त्यांनी दिला असं म्हणतात. मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर पण गोळीबाराचं पाप
मोरारजी देसाईंवर फोडण्यात आलं.
त्यावेळी capital city of maharashtra मुंबई राज्य होतं. मुंबई राज्यात कोकण, कर्नाटकाचा काही भाग,
पश्चिम महाराष्ट्र, काठियावाड म्हणजे दक्षिण गुजरात यांचा समावेश होता. व-हाड व विदर्भ मध्य प्रांतात होता
तर मराठवाडा निझामाच्या ताब्यात होता. भाषकांचा विचार करायचा तर मराठी, गुजराथी, कन्नड या तीन
भाषकांचं मुंबई हे राज्य होतं. मात्र त्यावर वर्चस्व होतं गुजराथी, पारसी भांडवलदार-उद्योजक यांचं.
आंदोलकांवर गोळीबार झाल्यानंतर महाराष्ट्राला खडबडून जाग आली. कणखर परंतु निस्पृह नेतृत्वाची
गरज वाटू लागली. म्हणून एस. एम. जोशी यांचं नाव पुढे आलं. शेकाप, रिपब्लिकन पार्टी, कम्युनिस्ट,
इत्यादी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एस. एम. जोशी यांचं नेतृत्व स्वीकारला. एस.एम. म्हणजे
संयुक्त महाराष्ट्र, असं समीकरण आचार्य अत्रे यांनी मांडलं. एस. एम. यांच्या हाती आंदोलनाचं नेतृत्व
आल्यानंतर एकही गोळीबार झाला नाही. आंदोलनाने हिंसाचारही घडवला नाही. मुंबईतील गुजराथी
भाषकांच्या वस्तीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते रात्री गस्त घालायला जात.
मराठी माणूस अन्याय सहन करत नाही मात्र हिंसाचारही करत नाही वा त्याच्यामध्ये सूडाची भावनाही नसते ही बाब या आंदोलनाच्या काळात सिद्ध झाली. द्वैभाषकाचे मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण यांनीही या आंदोलनाची दडपशाही केली नाही. या आंदोलनातून महाराष्ट्राची तेजस्वी प्रतिमा देशात उभी राह्यली. आंदोलन वस्तुतः capital city of maharashtra मुंबई कोणाकडे या विषयावर होतं. कारण ज्या राज्यात मुंबई त्या राज्याला मुंबईतील उत्पन्नाचा फायदा मिळाला असता. त्यासाठी मुंबईतील बिगर-मराठी भाषकांची मनं जिंकून घेता आली नाहीत तरी ते विरोधात जाणार नाहीत ह्याची खबरदारी घेणं आवश्यक होतं. एसएम आणि यशवंतराव दोघांनीही हे कार्य कौशल्याने पार पाडलं.
१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन. तो नवीन राज्याचा स्थापना दिन असावा ही कल्पना कॉ. श्रीपाद डांगे यांची. यशवंतरावांनी ही सूचना मान्य केली. म्हणून तर फौंटनचं नामकरण हुतात्मा चौक असं झालं. तिथे कामगार-किसान यांचा पुतळा उभारण्यात आला. समाजवादी भारतात, समाजवादी महाराष्ट्र या यशवंतरावांच्या धोरणाला कम्युनिस्ट, समाजवादी, आंबेडकरवादी, शेकाप यांचा पाठिंबाच होता. कार्यक्रमाच्या तपशीलाबाबत, दिशेबाबत मतभेद होते.
प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि एस.एम. जोशी यांच्या राजकीय वारसदारांकडे आज महाराष्ट्राची सत्ता आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणताना या सरकारने जनतेला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेतली. अर्थात कोणत्याही सरकारप्रमाणे या सरकारच्या कारभारातही अनेक लोच्ये झालेच, परंतु कारभाराची दिशा योग्य आहे. हे सरकार अस्थिर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजप-संघ परिवार आणि केंद्र सरकार करत आहे. मात्र भाजप शासित राज्यांमधील त्यातही देशाच्या राजधानीतील कोरोनाच्या साथीची हाताळणी करण्यात मोदी-शहा यांना आलेलं अपयश एवढं झगझगीत आहे की महाराष्ट्र सरकार पाडण्याची हिंमत त्यांना होणार नाही अशी आशा आहे.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा - सुनील तांबे Postbox India
2 Comments